आयुष्यात आणखी काय हवंय?

एका हातात भाजलेलं कणीस
दुसऱ्या हातात गरम भजी
वरती ढगांची चादर
खाली पाय पसरायला रिकामा डोंगर
विचारांचा कालवा विरघळायला लागतो
तेवढाच हवेत गारवा
मातीचा सुगंध येईल तितका
पण छत्री लागणार नाही इतका पाऊस
अशा संध्याकाळी कविता करायची सवय
बस, आयुष्यात आणखी काय हवंय?

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.