शिवाई

जन्म झाला शिवनेरी ।
रयत ऋणी जीजाई ।।
शप्पथ स्वराज्याची ।
रायरेश्वरी शिवलिंग साक्षी ।।

भेदरली आदिलशाही ।
पाहून रक्तरंजित भवानी ।।
धडकी मुगल दरबारी ।
तो नतमस्तक रामदासी ।।

उभा अखंड सह्याद्री ।
घेऊन दरी राई ।।
संगे समुद्र अरबी ।
शिवगुण गायी ।।

मग काय करू शाहिरी ।
कोड्यात हा गोंधळी ।।
खंत एकच तुळजाई ।
नशिबा नव्हती शिवाई ।।

Shivaji, who was born to Jijabai at the fort of Shivneri, renounced the inherited comforts and swore to establish self-rule for the people of the land. He shook the tyrannical powers of the Adilshah of Bijapur and the Mughal empire in Delhi fighting many violent battles while humbly accepting the teachings of Sant Ramdas. When today the hills of Sahyadri and the waves of the Arabian sea sing his praises, neither can I better them nor can I shed my envy for unlike them, my life could not witness the acts of his valor.

The format of this verse is called Pawada. Over the centuries, it was the song of the wandering poets in Maharashtra called Gondhali. In a prescient observation, Harry Acworth wrote the following in his book, “Ballads of the Marathas”, published in 1894, “…the advantages of civilization will no doubt, before many years are over, be too much for these products of a time when the steam-engine and the high school were not.”

हर हर महादेव

शत्रूची लूट
पंढरीची तूट
सोसले मुकट
हर हर महादेव

प्रजा बेजार
मुठीत तलवार
एकच ललकार
हर हर महादेव

शिवबाशी मेळ
मावळ्याचं बळ
स्वराज्याचा खेळ
हर हर महादेव

काफिरास संदेश
सोड प्रदेश
भवानीचा आदेश
हर हर महादेव

मातीची शप्पथ
उजळणार मुलुख
भगव्या रंगानं
हर हर महादेव

ओतून रक्तास
सजवू सह्याद्रीस
घडवू इतिहास
हर हर महादेव

History only remembers it’s leaders and heroes who led with a grand vision, but not the many without a name or face who gave their blood and sweat to make that vision a reality. With the war cry of हर हर महादेव (Har Har Mahadev), the mavala army of Shivaji captured over 300 forts across the rugged western ghats laying the foundation for swaraj or self rule.

PS: The religious references are only an attempt to recreate the times that existed 350 years ago. Today, such sentiments are anachronistic – as much as possible, religion and governance should stay as apart from each other.

कदाचित…

तीनही लोकांचा राजा
आईविना होतो भिकारी
होऊन सारे वजा
उरल्या फक्त आठवणी

भूक, ठेच, वेदना
झेलताना मुखात “आई”
आता साद घालाया
शब्द जिभेवर नाही

गरजा, अडचणी, दुःख
घेणारी तू ओंजळीत
राहून सदा हसतमुख
मग आज का निजलीस?

प्रत्येक श्वासात बंधला
तू दिलेला प्राण
कुठे फेडू हे ऋण?
माझे मन मौन

कुठल्यातरी पूर्वीच्या जन्माचं
पुण्य असेल कदाचित
लाभलं तुझं छत्र
जन्मलो तुझ्या कुशीत

कुठल्यातरी पूर्वीच्या जन्माचं
पापच असेल कदाचित
मुकलो तुझ्या देहास
चिताही तुझी शीत

बाजी

घोडखिंड मी उभा |
बाजूस बसली शांतता ||
काळोखात माझा माथा |
तेव्हा अनुभवली गाथा ||

सोडून गड पन्हाळा |
तोडून मृत्यूचा सापळा ||
जोडीस अभय मावळा |
पाहतो सर्जा चालला ||

चुरडाया स्वराज्य आली |
आदिलशाही हुकूम पाळती ||
मागे फौज बिजापुरी |
संगे मसूद सिद्दी ||

राजाला कळून चुकलं |
नाही थोपवून धरलं ||
तर जीव मुकेल |
मुलुख राहील भुकेलं ||

घेतला प्रण एकानं |
राहील खिंडीत टिकून ||
अंगात हत्तीचं बळ |
त्याचं हिरडस मावळ ||

नजरेत शिवाच्या गड |
वाट भलती अवघड ||
उडवायास शत्रूची धिंड |
तयार बाजीची खिंड ||

आले तीन प्रहार |
झाला घोर संहार ||
ताठ बाजी रक्तबंबाळ |
रोखून धरला काळ ||

असा मावळा व्यापला |
खिंडीतून पार जाया ||
पाखरू सुद्धा निषिद्ध |
झाली हार-जीत सिद्ध ||

वाट सिद्दी पाहतो |
बाजी केव्हा पडतो ||
नेण्यास यम येतो |
हात लावाया कापतो ||

त्राण नव्हता भरपूर |
“कुठं राजाचं पाऊल?” ||
विचार करतो शूर |
आले तोफेचे सूर ||

आखरी घाव झोकून |
मग घातले आलिंगन ||
कथा अनंत सांगीन |
रात्रीत झालो “पावन” ||

Read the English version here

अर्थ

मी उनाड वारा
तू थंड गारवा
मी ढग हरवलेला
तू निकट छाया

कठीण मी मंद
तू दरवळलेला सुगंध
अजागळ माझे व्यंग
तू सुरेख रंग

मज सारेच कबूल
तुझी मापून चाहूल
माझी नुसतीच चुलबुल
तुझे दृढ पाऊल

मज उगाचच फिकीर
तुज नेहमीच धीर
मी उदार फकीर
तुज कल्पवृक्षाचे जिर

तुझ्याविना सारे व्यर्थ
कोणास हवे अमृत
जेव्हा दिलास विनाशर्त
तू मज अर्थ

गराडा

विणलेस तू विश्व जसे
अगणित तीत कण असे
की कणाकणात विश्व वसे
पाहून तुझवर विश्वास बसे

पण नको बोलवूस मंदिरात तुझ्या
जमणार नाहीत त्या पूजा आर्च्या
व्यर्थ नाहीत का रे त्या साऱ्या आरत्या?
जिथे भक्तच तुझा दगड झाला रे वाल्या

कुठे भूमीवरच्या अदृश्य रेषांसाठी
रक्ताच्या थारोळ्यात कित्येक बळी
तर कोणी खेळतंय रक्ताचीच होळी
करून आपापल्या देवावर खेळी

कुठे द्रव्यामागे आहे बेलगाम धावपळ
तर कुठे दाण्याविना पोटात नुसतीच कळ
कुठे आवाढव्य महालात अगणित झुंबर
तर कुठे विसावण्यास नाही गळके सुद्धा छप्पर

म्हणून जोडतो हात कर दगड मज तुझ्यासारखा
नाहीतर पूर्ण कश्या करू स्वतःच्या आकांक्षा
जेव्हा आहे आजूबाजूला विखुरलेला
असंख्य अपूर्ण अगतिक स्वप्नांचा गराडा?

बळी

सोडले गडी, सोडले खेळ सारे,
सोडले अंगण, सोडले घर न्यारे,
सोडला देश, सोडून सारे झालो भटके,
अरे मानवा, इतके भांडण का रे?

बाप हरवला, बंधू हरपला,
सोडली कुशी, मायेने मिटले डोळे,
सोडला प्राण, बळी माझा ही घे,
पण अरे मानवा, इतके भांडण नको रे।

Alan Kurdi was a three-year-old Syrian boy of Kurdish ethnic background who made headlines around the world after being drowned in the Mediterranean Sea, as part of the Syrian refugee crisis.

अंतर

अनेक वेळा सागरास ही वाटत असावे
एकदा तरी चंद्रास जाऊन बिलगावे
मज्जाव करीत अनंत अंतर उभे
वेड्या लाटांनी सहज कापावे

पण नियमात असते भरती नंतर ओहोटी
थकुन लाटांना परतायचे असते माघारी
आणि मग अनंत अंतरेच सजवतात हा देखावा
चंद्राच्या तालावर लाटा घेतात मजेत झोका

म्हणाल तर प्रत्येक दृष्टीत दोनच सोबती
आकाश आणि त्याच्या छ्ताखालची धरणी
जरी वाटे होते भेट त्यांची क्षितिजावरती
याच आशेने ओलांडली हजारो क्षितिजे मिळून दोघांनी

मिठीत विसावण्यास मग धरती जेव्हा व्याकूळ असे
तिच्यासाठी जो गरजला नाही तो मेघ नसे
ह्या दुराव्यातच रंगतात रंग वसंत ऋतुचे
फुलते कुरुणात मग वसुंधरा घेऊन प्रीतीचे सडे

प्रवासात निघतात दोन तीर नदी बरोबरच
बागडणाऱ्या पात्रास सांभाळत नेतात खरंच
दोघांना ही तोडायचा असतो कर्माचा हा सापळा
टाकून सारे विचार करायचा असतो त्यांना ही आपला

येताच आठवण एकमेकांची मग जातो एक अश्रू ढळून
दोघांचा विरह सोडतो नदीला लहानाचे मोठे करून
आणि मग येतो प्रवासाचा शेवट हे जेव्हा दोघांना कळते
उगाच नाही नदी सागरा जवळ सर्वात खोल असते

विरहातच लपले असे हे निसर्गाचे धडे
न बोलता काही ह्या सर्वांनी आज पर्यंत ते गिरवले
मग का हे हृदय शोधते ह्या प्रश्नाचे उत्तर नवे
तुझ्या आणि माझ्या मधले अंतर निरंतर का राहावे?

वाट

झाडा फुलावेलींनी सजलेली ही वाट
निघुन दारासमोरून माझ्या हरवते जंगलात
सदा पक्ष्यांचा इथे येईल ऐकु कलकलाट
खेळून याच वाटेवरती वारा येतो माझ्या घरात

ह्याच वाटेवरती वचन दिलेस तू मला
“निघते आता, येईन फिरुनी पुन्हा एकदा”
दिवस गेले, गेल्या रात्री, ऋतू बदलले अनेकदा
गेले थकून डोळे देखील तुला शोधता शोधता

ना तू कुठे दिसलीस, ना तुझी सावली
वाट बघुन तुझी , ही वाट देखील थकली
“फिरतील का रे तिची पाऊले?” अशी शंका तिला आली
“अंधाऱ्या या जीवनात तुझ्या होईल का रे पहाट तिची?”

तू भेटशील पुन्हा, आहे विश्वास मला
कधी चेहऱ्यांच्या, कधी शब्दांच्या जगात शोधतोय तुला
नाहीस कुठेच तू , होते पुन्हा निराशा
निघते हृदयातुन मग आणखी एक कविता